ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एक महिन्याच्या आत शाळेवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, अन्यथा शाळेची मान्यता रद्द.शिक्षण विभागाच्या गंभीर आदेशानंतर सुध्दा बीड जिल्ह्यातील अनेक शाळांतून दिरंगाई.

पाठलाग न्युज/प्रतीनिधी:

एक महिन्याच्या आत शाळेवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, अन्यथा शाळेची मान्यता रद्द.शिक्षण विभागाच्या गंभीर आदेशानंतर सुध्दा बीड जिल्ह्यातील अनेक शाळांतून दिरंगाई.

बीड: खासगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांनी शासन निर्णयाच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत शाळा व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक आहे. या तरतुदीचे पालन न केल्यास संबंधित शाळेचे अनुदान रोखणे किंवा त्यांची मान्यता रद्द केली जाईल, असा इशारा शालेय शिक्षण विभागाने दिला असला तरी,बीड जिल्ह्यात या बाबत अनुत्सुकता दिसून येत आहे. बदलापूर येथील घटणेची दखल घेऊन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने बुधवारी सर्वच शाळांसाठी स्वतंत्र आदेश काढले आहेत. त्यानुसार शाळा व परिसरातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा हा उत्तम पर्याय असून शाळांनी मोक्याच्या ठिकाणी कॅमेरे ताबडतोब बसविणे बंधनकारक असल्याचा आदेश दिला आहे. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांनी प्राधान्याने सीसीटीव्ही बसवावेत. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी घ्यावा व त्या निधीची पुनर्रचना करून त्यातील पाच टक्के निधी यासाठी राखीव ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. दुसरीकडे सखी सावित्री समित्या नसतील तर त्या तत्काळ स्थापन कराव्यात व या समित्यांनी नियमित आढावा बैठका घेण्याचेही आदेश आठवडा पुर्वी काढलेल्या शासन आदेशातून दिले आहेत. शासन निर्णयानुसार खालील बाबींचे पालन करणे बंधनकारक.शाळा व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत व त्याचे फुटेज दररोज तपासण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर ठेवण्यात आली आहे. आठवड्यातून किमान तीनवेळा शाळा व्यवस्थापन समिती व शाळेच्या मुख्याध्यापकांनी ते सीसीटीव्ही फुटेज तपासले पाहीजे. शाळांमधील नियमित कर्मचाऱ्यांसह कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या सुरक्षारक्षक, सफाई कामगार, मदतनीस, बसचालक यांची चारित्र्य पडताळणी करावी. शाळांमध्ये बाह्यस्त्रोद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त करताना सहा वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने महिला कर्मचारी नेमावा. शाळांमध्ये तक्रारपेटी ठेवावी, आदेशानुसार कार्यवाही न केल्यास संबंधित मुख्याध्यापकांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. शाळांमध्ये आता विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन करण्यात यावी. शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या लैगिंक छळाच्या घटना होवू नयेत, यासाठी आता शाळा स्तरावर विद्यार्थी सुरक्षा समित्यांचे गठन केले जाणार आहे. एका आठवड्यात शिक्षणाधिकाऱ्यांनी या समित्या स्थापन कराव्यात, असेही आदेश देण्यात आले आहेत. तर राज्य स्तरावर शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती स्थापन करण्याचाही निर्णय झाला असून ही समिती तीन महिन्यातून एकदा आढावा घेईल. शासनाचा प्रस्तुत आदेश जारी होऊन आठ दिवसांचा कालावधी लोटला असला तरी,बीड जिल्ह्यातील अनेक संस्थांच्या शाळा अध्याप झोपेतच असल्याचे दिसत आहेत. बीड जिल्ह्यातील अनेक शाळेतून बदलापूर सारख्या घटणा घडून गेलेल्या आहेत परंतु त्यातील कांही घटणांमध्ये आरोपी शिक्षा भोगून बाहेर आले आहेत तर,अनेक घटणा संस्थाचालकांनी व्यवस्थापन स्तरावर दाबलेल्या आहेत.या गंभीर बाबी विचारात घेऊन शासन आदेशाचे सर्व शाळानी पालन करावे अशी पालक वर्गातूनही मागणी होत आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये