Breaking Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
एसआयटीच्या कारवाईला भेदरलेल्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना राज्य सरकारचा आश्वासित दिलासा.
पाठलाग न्यूज / प्रतिनिधी :

एसआयटीच्या कारवाईला भेदरलेल्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना राज्य सरकारचा आश्वासित दिलासा.

मुंबई /प्रतिनिधी: शिक्षणासारख्या पवित्र आणि अति महत्त्वाच्या क्षेत्रात शिक्षण विभागातले अधिकारी आणि शिक्षण संस्थाचालक यांच्या संगणमताने राज्यभरात शालार्थ आयडी घोटाळ्याचा भूकंप झाला असून, सदरील भूकंपाचा केंद्रबिंदू ठरलेल्या नागपूर विभागात घोटाळ्यातील संशयित आणि प्रथमदर्शी इन्फेक्टेड बड्या अधिकाऱ्यांची संस्था चालकांची व कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात अटक झाली आहे. नागपूरच्याच पार्श्वभूमीवर राज्यभरातील अनेक जिल्ह्यातील अशाच प्रकारच्या घोटाळ्याच्या तपासासाठी एसआयटीची घोषणा होताच अटकेला घाबरलेल्या शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांनी विना चौकशी कारवाई न करण्याच्या मागणीसाठी आंदोलने व रजा घेऊन लपून बसण्याचा प्रयत्न केला असतानाच राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे व शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल यांनी सदर अधिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन कुठल्याही अधिकाऱ्याला विना चौकशी दोषी ठरवून अटक केली जाणार नसल्याचे आश्वासन दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी पुकारलेले आंदोलन स्थगित करून कामावर रुजू होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची समोर आलेली माहिती अशी की,
